फुलटायमर । अण्णा सावंत । आत्मकथन
मुखपृष्ठ : सारिका उबाळे
पाने : ३१० । किंमत : ३२५/-
'फक्त आर्थिक लढे करून भागणार नाही. भांडवली व मनुवादी संस्कृतीचे हे गुलाम आहेत. तेव्हा या गुलामीतून शेतकरी,शेतमजूर,कामगार यांना बाहेर काढायचे असेल तर सांस्कृतिक, सामाजिक संघर्ष करावा लागेल.' हा संघर्षाच्या अनुभवातून आलेला निष्कर्ष कॉ. अण्णा सावंत यांनी चिंतनासाठी सर्वांसमोर ठेवला आहे. गेल्या ७०-७५ वर्षांतील सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक,राजकीय, धार्मिक, जातीय अस्मितांचा टोकदार होत गेलेला इतिहासच कॉ. अण्णा सावंत यांनी वस्तुनिष्ठ स्वरूपात येथे मांडला
आहे.
समाजात झालेले परिवर्तन, माणसाच्या बदललेल्या वृत्ती-प्रवृत्ती,
समाजाच्या संघर्षाच्या मर्यादा, क्रांतीचे स्वप्ने आणि त्याभोवतीचा परीघ, जात-धर्मजाणिवेने
न आलेले वर्गभान,चळवळींचा नित्य होणारा संकोच यांसह समाजाचे प्रखर वास्तव हे या आत्मकथनाचे
विशेष आहेत.
- प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर